लंडन: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा आणि नागालँडसह पूर्वोत्तर राज्यांत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात हिंसक निदर्शने होत आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात परदेशातही निषेध सुरू आहे.
लंडनमधील भारतीय दूतावासाच्या बाहेर मूळ आसाम वंशाच्या लोकांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शविला. हा कायदा धर्माला वेगळा करणारा असून धार्मिक भेदभावावर आधारित असल्याचे आंदोलकांनी सांगितले. ते म्हणाले की आम्ही आमच्या आसाम कुटुंबियांसोबत एकजुटीने उभे आहोत. त्यांनी आपला आवाज ऐकावा अशी आपली इच्छा आहे.
नवीन कायद्यामुळे आसामी संस्कृती आणि अर्थव्यवस्था या दोघांनाही धोका आहे, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. आम्हाला कोणताही आव्रजन कायदा नको आहे. आव्रजनचा सामना करण्यास आपली अर्थव्यवस्था फिट नाही.
आंदोलनकर्त्यांनी आसाममध्ये राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना होणाऱ्या अडचणींबद्दल सांगितले. आसाममध्ये आमची कुटुंबे अडचणीत असून फोन सेवा ठप्प असल्यामुळे कुटुंबासोबत होत नाही आहे. तसेच रुग्णालयांची स्थिती देखील वाईट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सतर्क राहण्याच्या सूचना
तथापि, अमेरिका, ब्रिटन, इस्त्राईल, कॅनडा आणि सिंगापूरसह अनेक देशांनी ईशान्य भागात प्रवास करताना नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.