दिल्ली : झारखंडच्या दुमका येथील निवडणूक जाहीर प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकता दुरुस्ती कायदा आणि झारखंड विकासाच्या मुद्यावर कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. कॉंग्रेस ईशान्य भारतात आग लावत असल्याचा आरोप त्यांनी केला. झारखंडच्या विधानसभा निवडणूक प्रचारार्थ पंतप्रधानाचा हा पाचवा दौरा होता. सोमवारी २० डिसेंबरला झाखंडमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे.
ये कांग्रेस और उसके साथी हो-हल्ला मचा रहे हैं, तूफान खड़ा कर रहे हैं। उनकी बात चलती नहीं है तो आगजनी फैला रहे हैं। ये जो आग लगा रहे हैं, टीवी पर जो उनके दृश्य आ रहे हैं, ये आग लगाने वाले कौन हैं, उनके कपड़ों से ही पता चल जाता है: पीएम श्री @narendramodi #JharkhandModikeSaath pic.twitter.com/D7eWV2I62f
— BJP JHARKHAND (@BJP4Jharkhand) December 15, 2019
पंतप्रधान म्हणाले, ‘संसदेने नागरिकत्व कायद्यात बदल केले आहे. त्यामुळे शेजारील देशात राहणारे हिंदू, शीख, ख्रिश्चन, पारशी, बौद्ध आणि जैन यांना भारतीय नागरिकत्व मिळू शकेल. संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक बहुमताने मंजूर केले आहे. त्याविरूद्ध कॉंग्रेस आणि त्याचे सहयोगी जाळपोळ करीत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, झारखंडच्या विकासासाठी जेएमएम आणि कॉंग्रेसचा कोणताही रोडमॅप नाही किंवा त्यांचा राज्यात विकास करण्याचा कोणताही हेतू नाही. यापूर्वी त्यांनी काहीही केले नाही. कॉंग्रेसला फक्त एकच गोष्ट माहित आहे आणि ती म्हणजे भाजपाला विरोध करणे आणि मोदींना शिवीगाळ करणे. हा आमचा विरोध करत नसून देशाला विरोध करीत आहे.