पुणे – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी विपूल साहित्य निर्मितीद्वारे त्यावेळी समाजाला दिशादर्शनाचेच काम केले. आजही माझ्यासारख्या कलाकाराला अण्णाभाऊंचे पोवाडे सादर करताना रोमांचित व्हायला होते, ही त्यांच्या शब्दांचीच ताकद म्हणावी लागेल. अण्णा भाऊ साठे यांना लोकशाहीर ही उपाधी लावण्याआधी मी त्यांना स्वातंत्र्यसैनिक ही उपाधी लावणे अधिक संयुक्तिक मानतो. अण्णा भाऊंनी त्यांच्या पोवाड्यांमधून डफलीवर थाप मारून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत फुंकलेल्या क्रांतीच्या रणशिंगाला तोड नाही, अशा भावना लोककलावंत आणि पार्श्वगायक नंदेश उमप यांनी व्यक्त केले.
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशतादी सांगता समारंभानिमित्त शुक्रवारी संवाद आणि समर्थ युवा फाऊंडेशनच्या वतीने उमप यांना “लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, उपमहापौर सरस्वती शेडगे, पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सुनील महाजन, राजेश पांडे, विद्यापीठाच्या आण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भणगे आदी उपस्थित होते. दरम्यान, संवादक मिलिंद कुलकर्णी यांनी उमप यांच्याशी संवाद साधला. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा छोटेखानी कार्यक्रम शासकीय नियमांत पार पडला.
यावेळी सुनील महाजन यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली. राजेश पांडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सोशल मीडियावर लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आले, असे संस्थेने