Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A आघाडीला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रीय लोकदल (RLD) आणि भारतीय जनता पार्टी (BJP) यांच्यातील करार निश्चित झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएलडीला लोकसभेची दोन आणि राज्यसभेची एक जागा दिली जाईल आणि एनडीएमध्ये सामील होण्याची घोषणा दोन आठवड्यांत केली जाईल.
सध्या यूपीच्या राजकारणात आरएलडी आणि भाजप यांच्या युतीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचवेळी जयंत चौधरी यांचे मौन या प्रकरणाला अधिक हवा देत आहे. मात्र, याबाबत आरएलडी अध्यक्ष जयंत सिंह यांच्याकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. जयंत चौधरी इंडिया आघाडी सोडून एनडीएमध्ये सामील झाले तर समाजवादी पक्षाचे निवडणुकीचे गणितही बिघडू शकते. मात्र, सपा आणि आरएलडीमध्ये सात जागांवर समझोता झाल्याची चर्चा होती. आता एनडीएमध्ये जयंत यांना लोकसभेच्या दोन जागा मिळतील, असे बोलले जात आहे.
आयएनएसच्या वृत्तानुसार, जयंत चौधरी एनडीएमध्ये सामील झाल्याबद्दल सुहेलदेव भारतीय समाज पक्ष (सुभाषपा) प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी सांगितले की, आरएलडी प्रमुख जयंत चौधरी 12 फेब्रुवारीला भाजप युतीचा भाग होणार आहेत. यासोबतच माजी कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी 12 फेब्रुवारीपर्यंत थांबा आणि निकाल काय लागतो ते पाहा, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.
भाजप आणि आरएलडी यांच्यातील युतीबाबतच्या अटकळांवर अखिलेश यादव म्हणाले की, भाजपला पक्ष कसे फोडायचे हे माहित आहे, कोणाला कधी सामील करायचे, कधी विकत घ्यायचे हे सर्व माहीत आहे. यापूर्वी अखिलेश यादव म्हणाले होते की, जयंत चौधरी हे खूप सेटल व्यक्ती आहेत, त्यांना राजकारण कळते. सपा प्रमुख म्हणाले होते की मला आशा आहे की ते शेतकऱ्यांचा सुरू असलेला संघर्ष कमकुवत होऊ देणार नाहीत.
दरम्यान, आज दुपारी आरएलडीचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन आगरी म्हणाले होते की, “हे निवडणुकीचे वर्ष आहे, अनेक पक्ष आमच्यासोबत युती करण्यासाठी येत आहेत. भाजपने मागच्या वेळीही युतीची ऑफर दिली होती, यावेळीही ती ऑफर दिली जात आहे. आम्ही 4 जागांवर बोलत आहोत. मात्र लोकसभेच्या 12 जागांसाठी आम्ही तयारी केली आहे.आम्ही कोणाशी युती करून निवडणूक लढवायची ते आम्ही ठरवू.जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या आमच्या मागण्या मान्य करणाऱ्या पक्षाला आम्ही पाठिंबा देऊ. युती करून निवडणूक लढवू. ”
#WATCH राष्ट्रीय लोक दल(RLD) के राष्ट्रीय प्रवक्ता पवन आगरी ने कहा, “चुनावी वर्ष है, बहुत सारी पार्टियां हमारे साथ गठबंधन के लिए आ रही हैं…भाजपा के द्वारा पिछली बार भी गठबंधन की पेशकश की गई थी, इस बार भी पेशकश की जा रही है। वे 4 सीटों की बात कर रहे हैं लेकिन हमने 12 लोकसभा… pic.twitter.com/wkEwJHVc4V
— ANI_HindiNews (@AHindinews) February 7, 2024