भाजपात पदाधिकारी निवडीवरुन पक्षांतर्गत नवा कलह
राजेंद्र वाघमारे
नेवासा – लोकसभा निवडणूकांचा बिगुल वाजलेला असतांनाच ऐन निवडणुकांच्या रणधुमाळीत नेवासा तालुक्यात सेना – भाजपाचा पक्षांतर्गत वादात ठिणगी पडल्यामुळे सेना – भाजपाचा वाद आता चांगलाच चव्हाट्यावर आलेला आहे.
या भाजपाच्या वादाला पदाधिकारी निवडीचे झालर आहे तर सेनेच्या वादाला पक्षाचा एकच पदाधिकारी आपला टेंभा मिरविण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी उघड नाराजी व्यक्त करत शिवसेनेच्या बैठकांपासूनही चार हात लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे.
ऐन निवडणुकांच्या रणधुमाळीत सेना – भाजपामध्ये तु..तु..मै..मै… सुरु होऊन पक्षांतर्गत वादाची नवी ठिणगी पडल्यामुळे हा वाद शमणार? की, पुन्हा पेटणार?असा सवाल या निमित्ताने राजकिय रणांगणात सध्या उपस्थित होतांना दिसून येत आहे.
या पक्षांतर्गत वादाचे स्वरुप वास्तवात असे असल्याचे कार्यकर्त्यांतून बोलले जाते की, ‘भाजपाच्या पदाधिकाऱ्यांत पद नियुक्त्यांवरुन अंतर्गत धुसफुस सुरु होवून हा वाद आता उघडपणे चांगलाच चव्हाट्यावर येतांना दिसून येत आहे तर शिंदे सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांतही आता पक्षांतर्गत खडाजंगी चागंलीच सुरु झालेली आहे. भाजपाच्या पक्षांतर्गत वादावर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना साई बाबांचा “श्रद्धा और सबुरीचा” मंञ देत पक्षांतर्गत वाद शमविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केलेला असला तरी भाजपातंर्गत दोन गट निर्माण झाल्याची कार्यकर्त्यांमध्ये उघडपणे चर्चा सुरु झालेली आहे.’
तर शिंदे सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांतही शिवसेनेचा एकच पदाधिकारी इतर पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता आपलाच सुवतासुभा मिरवत आपलाच झेंडा आणि आपलाच दांडा इतर पदाधिकाऱ्यांना दाखवत असल्यामुळे सेनेचे प्रमुख पदाधिकारीही मोठे ना’राज’ झालेले असून शिवसेना पक्षावर आणि खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर प्रेम अन् आपुलकी कायम ठेवून सेनेतील एका पदाधिकाऱ्यामुळे सेनेत बंडाळी आणि दुफळी निर्माण झालेली आहे त्यामुळे या पदाधिकाऱ्यांच्या मनमर्जीच्या भूमिकेमुळे काही जेष्ठ पदाधिकारी आता बैठकांपासूनही चार हात लांब राहण्यात धन्यता मानत आहेत शिवसेनेचा या पक्षांतर्गत वादाला अशी थीणगी पडल्यामुळे ऐन लोकसभा निवडणूकीच्या आखाड्यात उमेदवार जाहीर होण्यापुर्वीच सेना – भाजपातील पक्षांतर्गत वाद निवडणुकांचे ढोल वाजण्यापुर्वीच चव्हाट्यावर आलेला असल्यामुळे भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना ‘आवर’ घालून वाद शमविण्यासाठी श्रद्धा और सबुरीचा ‘मंञ’ दिलेला असल्यामुळे हा काही प्रमाणात शमला गेला असला तरी दोन गट या वादातून निर्माण झालेले आहेत.
माञ शिंदे सेनेत एक पदाधिकारीच आपली चलती चालवच असल्यामुळे इतर पदाधिकारी ना’राज’ होवून दुफळी निर्माण झालेली असतांनाही याकडे माञ वरिष्ठ नेत्यांचे दुर्लक्ष झालेले असल्यामुळे सेनेतही आता कोणीच कोणाचा गुरु आणि कोणीच कोणाचा चेला राहिलेला नसल्यामुळे ‘गुरुवरच विद्या’ उलटविण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप सेनेतही सुरु झालेला असल्यामुळे या पदाधिकाऱ्यांच्या वादावादीमुळे चांगलाच कलह सुरु झालेला असल्याचे सेना – भाजपाच्या पदाधिकाऱ्यांतून उघडपणे बोलले जात आहे.
भाजपाच्या तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मतभेद निर्माण करुन पक्षांतर्गत दोन गट निर्माण झालेले असून भाजपाचे ना’राज’ पदाधिकारीच आता दुसऱ्याच्या खांद्यावर ‘बंदूक’ ठेवून सोशल मीडियात गोळीबार करतांना दिसून येत आहेत तर सेनेत आपलाच झेंडा आणि आपलाच दांडा घेवून मिरविणाऱ्या पदाधिकाऱ्यामुळे जुने – जाणते पदाधिकारीही आता अलिप्त राहण्याचा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात असतांना याकडे निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांतील वाद शमविण्यात दुर्लक्ष झाल्यास याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
सेना – भाजपात सुरु असलेला हा पक्षांतर्गत वाद नेमका शमतो की, पेटतो याकडे राजकिय निरिक्षकांचे लक्ष लावून आहे कोण ओरिजनल ? आणि कोन ?.. कसा हे ओळखण्याची जबाबदारी वरिष्ठांनी घेवून पक्षांतर्गत कुजबूज थांबून लोकसभेच्या आखाड्यात पेटलेला पक्षांतर्गत वाद शमविण्यासाठी वेळीच प्रयत्न न केल्यास याचा फटका लोकसभा निवडणूकीमध्ये बसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची शक्यता कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.
हे वाचाल का ? कोणी ३५ कोटी तर कोणी २५ कोटी केले दान..! वाचा देशातील ‘या’ १० उद्योगपतींची ”यादी”