Lok sabha election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतील पक्षांचं लोकसभा मतदार संघाचं वाटप नेमकं कस असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अगदी त्याच प्रमाणे महायुतीतील पक्षांमध्ये देखील जागा वाटपाबाबत कस समीकरण असणार याकडे याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.अशात ठाकरे गटाच्या नेत्याने भाजप 220 च्या पुढे जाणार नाही असं भाकीत वर्तवलं आहे. | Lok sabha election 2024
भाजपकडून सध्या अबकी बार चारशे पारचा नारा दिला जात आहे.अशात नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार नाहीत एवढ्या जागांचा टार्गेट आम्ही ठेवलं आहे असं म्हणत भाजप 220 च्या पुढे जाणार नाही असं भाकीत ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी वर्तवलं आहे. एका मराठी न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. | Lok sabha election 2024
राऊत म्हणाले,”देशाचा नकाशा समोर ठेवा आणि राज्यानुसार गणितं मांडा. कुठून आणणार भाजप जागा ? उत्तर प्रदेशातील 80 जागा त्यांना मिळून द्या, छत्तीसगड, हरियाणा, तेलंगनातील सर्व जागा त्यांना घेऊ द्या भाजप 220 च्या पुढे जाणार नसल्याची आकडेवारीच त्यांनी यावेळी सांगितली. | Lok sabha election 2024
इंडिया आघाडीच्या राज्यांचा विचार केला तर इंडिया आघाडी किमान 290 जागा जिंकेल. दिल्ली,गुजरात,हरियाणा आणि पंजाब अशा ठिकाणी आप आणि काँग्रेसची युती झाली आहे. पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जी आणि काँग्रेसलाच जागा मिळेल असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.