मुंबई – सध्याच्या आव्हानात्मक काळात जोखीम संरक्षण चालू ठेवण्यासाठी या आर्थिक वर्षात दुसऱ्यांदा एलआयसी तर्फे विमाधारकांना त्यांची लॅप्स झालेली योजना पुन्हा सुरु करण्यासाठीची योजना सादर करण्यात आली आहे. बंद पडलेल्या व्यक्तिगत योजनांसाठी पुनरुज्जीवन मोहीम 7 फेब्रुवारी 2022 पासून 25 मार्च 2022 पर्यंत राबविण्यात येणार आहे.
सध्याच्या परिस्थितीकडे बघता, एकूण जे प्रीमियम भरले जाते त्यावर आधारित टर्म अश्योरंस आणि जास्त जोखीमवाल्या योजना यांच्या व्यतिरिक्त इतर योजनांसाठी विलंब शुल्कात सवलत देण्यात येणार आहे. वैद्यकीय गरजांवर सवलती देण्यात येणार नाहीत. पात्र आरोग्य आणि सूक्ष्म विमा योजनांनाही विलंब शुल्कातील सवलत मिळणार आहे.
विशेष पुनरुज्जीवन मोहीमेंतर्गत काही अटींनुसार विशिष्ट पात्र योजनांचे पहिल्या न भरलेल्या हप्त्याच्या तारखेपासून 5 वर्षांमध्ये पुनरुज्जीवन करता येऊ शकेल. टर्म अश्योरंस आणि मल्टीपल रिस्क पॉलीसी इत्यादी सारख्या जास्त जोखीम योजना या सवलतींसाठी पात्र नाहीत. या मोहिमेंतर्गत ज्या योजना हप्ता भरण्याच्या काळात बंद पडल्या आहेत आणि ज्यांची योजनेची मुदत संपलेली नाही त्या योजना यासाठी पात्र आहेत.
न टाळता येणाऱ्या परिस्थितीमुळे ज्या विमाधारकांना हप्ते भरणे शक्य झाले नाही आणि त्यामुळे त्यांची विमा योजना बंद अवस्थेत आहे त्यांना फायदा मिळावा म्हणून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.