खालापूर, (वार्ताहर) – लोकशाही वाचवायची असल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजय करत दडपशाही सरकार हद्दपार करण्यासाठी आपण सज्ज होऊया, असे प्रतिपादन युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केले.
महाविकास आघाडीच्या मावळ लोकसभा मतदार संघाचा युवा महाराष्ट्र मेळावा युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाला. खोपोली शहरात झालेल्या या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी उपजिल्हाप्रमुख शिवसेना नितीन सावंत, कोर कमिटी सदस्य योगेश निमसे, धनश्रीताई विचारे, राजोलपाटील, प्रांजल महाडेश्वर,
विभागीय सचिव अविनाश बलकवडे, पुणे जिल्हा समन्वयक संतोष म्हात्रे, सरचिटणीस दिनेश ठोंबरे, शिवसेना खालापुर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, मावळ लोकसभा निधीक्षक शैलेश मोहिते पाटील, युवासेना विस्तारक कोल्हापूर विशाल विचारे, मावळ जिल्हा अधिकारी अनिकेत घुले, रायगड जिल्हा अधिकारी पराग मोहिते,
समन्वयक प्रशांत खांडेकर, चिटणीस निखिल पाटील, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, नितेश पाटील, पिंपरी चिंचवड शहर अधिकारी चेतन पवार, चिंचवड विधानसभा प्रमुख विशाल नाचपल्ले, पिंपरी विधानसभा प्रमुख शुभम मुळे, उपशहरप्रमुख मयुर पवार आदी उपस्थित होते.
येणारी लोकसभा ही शेवटची लोकसभा होऊ शकते. भाजपा वचन नाम्यावरील ९५ टक्के कामे झालेच नाही, उलट महागाई वाढतच गेली आहे, असे मत वरून सरदेसाई यांनी व्यक्त केले.