मुंबई – शिंदे गटाने (Shinde Group) मुंब्रा येथे गेली 25 वर्षे अस्तित्वात असलेली शिवसेना शाखा (Mumbra Shakha) बुलडोझरचा वापर करून पाडून टाकली आहे, या प्रकरणी आम्ही आता न्यायालयात जाऊन कायदेशीर कारवाई करू असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत 40 लोकही नाहीत. ते म्हणजे शिवसेना (Shivsena) नाहीत. काल मुंब्य्रात तुम्ही पाहिलेली खरी शिवसेना आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) तिथे पोहोचले तेव्हा सगळे रस्त्यावर आले होते. जर तुम्ही पोलिसांचा वापर केला नसता तर आम्ही ही शाखा ताब्यात घेतली असती.आज पोलिस तुमचे गुलाम आहेत, उद्या तेच पोलिस आमच्या आदेशाचे पालन करतील, मग तुम्ही काय कराल? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.
“भाजपचे (bjp) उद्दिष्ट नेहमीच दोन व्यक्तींमधील भांडणाचा फायदा उठवायचे असते. जाती आणि धर्माच्या आधारे देश तोडण्याचा भाजपचा विचार आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महाराष्ट्रात भाजपच्या विचारांचे प्रचारक आहेत का? आपल्या उद्योगपती मित्रांना श्रीमंत करणे आणि गरिबांना आणखी गरीब करणे हाच भाजपचा एकमेव अजेंडा आहे. आज भाजप घाबरला आहे, 2024 मध्ये जिथे जिथे ते हरत आहेत तिथे ते छापे टाकत आहेत, असे देखील राऊत यावेळी म्हणाले.