चिचोंडी पाटील: पाण्याचा निर्माण झालेला गंभीर प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे चांगला पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे, अशी प्रार्थना आ. राहुल जगताप यांनी केली.
नगर तालुक्यातील साकत खुर्द येथील सीना नदीवरील केटीवेअर बंधारा दुरुस्तीच्या कामाचा प्रारंभ आ. जगताप यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. आ. जगताप म्हणाले, मी प्रत्यक्ष कामांचेच नारळ फोडतो. पोकळ आश्वासने देत नाही. बंधारा दुरुस्तीची मागणी अनेक दिवसांची होती. त्याचे काम सुरु झाले याचा आनंद आहे.
याप्रसंगी सरपंच बापू केदारे, उपसरपंच पाराजी चितळकर, बाजार समितीचे अभिलाश घिगे, दत्तात्रय चितळकर, भानुदास पवार, मोहन पवार, पोपट पवार, सेवा सोसायटीचे अध्यक्ष अशोक शिंदे, ग्रा. पं. सदस्य तात्या वाघमोडे, किशोर पवार, बाबा चितळकर, पोपट पवार, शिवाजी शिंदे, उद्धव शिंदे, चांगदेव शिंदे, लक्ष्मण निमसे, बंडू निमसे, धर्मा निमसे, दादा वाघमोडे, बाळू बेरड, सुकाणूचे अविनाश पवार, बापू वाघमोडे, बापू निमसे, शेखर बोचरे, शरद निमसे, पांडुरंग शिंदे, रामदास चितळकर, प्रा. अविनाश निमसे, अभियंता सचिन झनझने, बापू खामकर, नितीन अण्णा डुबल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. येथील बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत होती. त्यामुळे बंधाऱ्याचे काम करण्यासाठी सुकाणू समितीने सातत्याने पाठपुरावा केला. हा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.