नवी दिल्ली – खुनशी सरकारने कार्यकर्त्यांवर खटले दाखल करण्याचे तातडीने थांबवावे, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. त्याचबरोबर पक्षाने या अटकेची तीव्र शब्दात निर्भत्सना केली आहे. हे खटले थांबवा. बंगळुरूमधील दिशा रवी हीची दिल्ली पोलिसांनी केलेल्या अटकेचे घृणास्पद कृत्य तीव्र शब्दात निषेध करण्यासारखे आहे. तिच्यावरील आरोप सरकारने तातडीने मागे घेऊन तिची सुटका करावी, अशी मागणीही या पक्षाने केली आहे.
आम आदमी पक्षाने दिक्षा रवी हिच्या अटकेचा उल्लेख बेकायदा अपहरण असा केला आहे. हा लोकशाहीवरील बेमुर्वतपणे केलेला हल्ला आहे. आपल्या शेतकऱ्यांना पाठींबा देणे हा गुन्हा नाही असे आम आम आदमी पक्षाने म्हटले आहे. अर्णब गोस्वामीला जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक दिवशी व्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण व्हायला हवे असे म्हटले होते, याकडे आपचे प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी लक्ष वेधले.
दिक्षा रवी यांच्या अटकेचा मी निषेध करतो. या कारवाई विरोधात तरूणांनी आणि विद्यार्थ्यांनी आवाज उठवायला हवा, असे आवाहन माजी केंद्रीय अर्थ मंत्री पी चिदंबरम यांनी केले आहे.
भारतीय अधिकाऱ्यांनी दिशा रवी या 21 वर्षीय महिला कार्यकर्तीला अटक केली आहे. कारण तीने शेतकरी आंदोलना कसा पाठींबा द्यावा याचे टूलकीट तयार केले. ही या घटनांची एक मालिका आहे.
सरकारकडून कार्यकर्त्यांची धरपकड करून त्यांचा आवाज का दाबत आहेत याचा जबाब मागितला पाहिजे, असे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस यांनी म्हटले आहे.
दिशा रवीच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. हे तुझ्याबाबत घडले यासाठी आम्हाला माफ कर भगिनी. आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत. खंबीर रहा हा अन्याय दूर होईल. दिल्ली पोलिसांचा निषेध असे ट्विट अभिनेता सिध्दार्थ याने केले आहे.