कोल्हापूर- मे आणि जून महिन्यातील सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी कोल्हापूरमध्ये गर्दी केली आहे. पर्यटनाचा आनंद घेत असतानाच करवीर निवासिनी अंबाबाई दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून मंदिरात गर्दी केली होती . अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच पर्यटक भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या तर दुपारच्या वेळेस ही रांग अगदी भवानी मंडपापर्यंत गेली होती.
भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून देवस्थान समितीच्या वतीने अंबाबाई मंदिर परिसरामध्ये मंडपाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सुट्ट्यांमध्ये जवळपास 10 लाखाहून अधिक भाविकांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतलं.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/2710300049045271/
अंबाबाई दर्शनानंतर अस्सल कोल्हापुरी पदार्थांचा आस्वाद घेत खरेदीचा आनंदही लुटला. दिवसभर प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या. मे आणि जून महिन्यातील सलग सुट्ट्यांची पर्वणी साधत पर्यटक कोल्हापुरात दाखल झाले आहेत. कुटुंबांसह पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी करवीर निवासिनी अंबाबाई आणि भवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर अनेक ऐतिहासिक स्थळांनी भेटी दिल्या.
अंबाबाई दर्शनासाठी तर भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती. अंबाबाई मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने भाविकांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी मंडप, पिण्यासाठी पाणी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती.