पुणे – मध्य रेल्वेने किसान रेल्वेच्या माध्यमातून सुमारे 5 हजारांहून अधिक टन मालाची वाहतूक केली.
प्रवासी सेवा बंद असल्याने रेल्वेकडून किसान, पार्सल आणि श्रमिक विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. शेतमाल, नाशवंत पदार्थांची जलद वाहतूक व्हावी, या हेतूने किसान रेल्वे चालवण्यात येत आहे.
किसान रेल्वेद्वारे 2 ऑक्टोबरपर्यंत 19 ट्रीपद्वारे सुमारे 5 हजार 223 टन मालाची वाहतूक केली.
यामध्ये 2 हजार 39 टन डाळींब, 1 हजार 303 टन भाज्यांसह मिरची, आले, लिंबू, मासे आदींचे परिवहन करण्यात आले.