Maratha Reservation – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण सुरु केले आणि हे आंदोलन आता राज्यव्यापी बनले आहे. राज्यातील विविध गाव, शहरांमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने, उपोषणे केली जात आहेत. राजकीय नेत्यांना घेराव घालूनही जाब विचारला जात आहे. विविध लोक आता यावर आपले मत व्यक्त करत आहेत. प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील (Shivleela Patil) यांनीही आपली प्रतिक्रिया देताना खंत व्यक्त केली आहे. शिवलीला म्हणाल्या, आमच्या सारख्या युवकांच्या भविष्यासाठी मराठा आरक्षणाची गरज आहे आणि ते मिळालेच पाहिजे.
हम मरे तो किन हरामजादोंके लिये –
शिवलीला पाटील म्हणाल्या, ‘ज्यांनी आमच्यासाठी त्यांचा देह पणाला लावला, जे वर बसलेत ते खाली आमच्याकडे पाहून म्हणत असतील “यहा कोई मरे वोटों के लिये, तो कोई मरे नोटो के लिये, भगतसिंग, सुखदेव, शिवाजी महाराज भी सोचते होंगे, हम मरे तो किन हरामजादोंके लिये” अशी सध्याची स्थिती आहे. आमच्या हजारांचा बंडल ज्याच्या खिशात त्याचे नाव दारिद्रय रेषेत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कमीत कमी ज्याला गरज आहे त्याला तरी आरक्षण मिळावं आता काही जण म्हणत असतील की तुम्हीच म्हणत होतात आम्हाला आरक्षण नको. आम्ही पाटील, देशमुख आहोत आम्हाला आरक्षणाची काय गरज. पण एखाद्या विद्यार्थ्याला 99 टक्के गुण मिळूनही जर त्याला चांगल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळत नसेल तर त्या मुलाच्या बापाला जाऊन विचारा त्याला काय वाटतं ते. जेव्हा चांगले गुण मिळूनही आरक्षण असल्यामुळे दुसऱ्या विद्यार्थ्याला संधी मिळते तेव्हा आमच्या विद्यार्थ्यांना जाऊन विचारा त्यांना काय वाटतं.’
पुढे बोलताना शिवलीला पाटील म्हणाळ्या की, ‘ज्याला गरज आहे, त्याला आरक्षण मिळालेच पाहिजे. तसेच आरक्षण नसल्याने अनेक युवकांची क्षमता असताना त्यांना नोकरी मिळत नाही.’ ज्यांची अशी संधी हुकते त्यांच्या आई-वडिलांना विचारा आरक्षणाचे काय महत्व आहे? असा सवालही त्यांनी विचारला. ‘आमच्या सारख्या युवकांच्या भविष्यासाठी आरक्षणाची गरज आहे आणि ते मिळालंच पाहिजे असे माझे ठाम मत आहे’.
दरम्यान, मनोज जरांगे (manoj jarange patil) यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण अद्याप सुरु आहे. सरकारकडून शिष्टमंडळ त्यांच्याभेटीसाठी आले. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावर उपाय योजनांसाठी सरकारला वेळ देण्याची गरज आहे. उपोषण मागे घ्या असे सांगण्यात आले मात्र जोपर्यंत आरक्षणाबाबतच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर उपोषण सुरुच राहणार असे जरांगे पाटील यांनी म्हंटले आहे.
आमदार राम शिंदे जरांगे पाटलांच्या भेटीला –
‘तुमच्या आमच्या हक्कासाठी, न्यायासाठी अन् भविष्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी लोकशाही पध्दतीने उपोषण सुरू केले. या अंदोलनातून त्यांनी शासनाचे प्रशासनाचे, राज्यकर्त्यांचे लक्ष वेधलये, म्हणून सरकार त्यांच्या म्हणण्याला वारंवार दाद देतये, झुकतये म्हणले तरी वावगे ठरणार नाही. मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यांनी हाती घेतलेल्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी, मी आणि माझ्या मतदारसंघातील पदाधिकार्यांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती आमदार प्रा. राम शिंदे यांनी दिली.