पुणे – लग्नास नकार दिल्याने प्रेयसीचे अपहरण करून तिच्यावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रसाद रमेश सोनवणे, नदीम शेख (दोघेही रा. रामटेकडी) व चंदन चव्हाडके (रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी 25 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणी 2011 मध्ये रामटेकडी येथे रहायला असताना तिच्या घरासमोर प्रसाद सोनवणे रहात होता. तेथे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मागील 7 ते 8 वर्षे त्यांच्यात प्रेमसंबंध होते.
दरम्यान, तरुणी कुटुंबासह वडकीनाला येथे रहायला गेली. यानंतर प्रसादने तेथे जाऊन तिला लग्नाची मागणी घातली होती. मात्र, तो दारुच्या आहारी गेल्याने तो तिला मारहाणही करत होता. त्यामुळे तिने सर्व संबंध तोडून टाकले. तरीही तो तिच्या कामाच्या ठिकाणी कार्यालयाबाहेर थांबून तिला त्रास देत होता. दरम्यान, प्रसादने गुरुवारी 2 मित्रांसह रिक्षा घेऊन तिचे कार्यालय गाठले. ती कार्यालयातून बाहेर पडताच तिला रिक्षातून पळवून नेले. लग्नास नकार दिल्यावर रिक्षातच तिच्यावर चाकूने वार करून तिला स्वत:च्या घरी घेऊन गेला. ही घटना तिच्या बहिणीस कळताच ती प्रसादच्या घरी धावत गेली. यानंतर तिने तिला साने गुरुजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
जिवंत असेपर्यंत त्रास देत राहील…
प्रसाद, नदीम व चंदन यांनी संगनमत करून फिर्यादीस मुंढवा येथील उड्डाणपुलाजवळून रिक्षामध्ये जबरदस्तीने बसवून हडपसरमधील औद्योगिक वसाहतीच्या परिसरात नेले. तेथे प्रसादने तिला पुन्हा लग्नाची मागणी घातली. तिने नकार दिला. त्यामुळे प्रसादने त्याच्या हातातील चाकूने तिच्यावर वार करून तिला गंभीर जखमी केले. “तुझे लग्न कुठे जमु देणार नाही, तु जिवंत असेपर्यंत तुला त्रास देत राहील, अशा शब्दात फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली.