कार्ला – मावळ तालुक्यातील करंडोली जेवरेवाडी येथे शेतात वाडा घेऊन बसण्यासाठी आलेल्या एका मेंढपाळाच्या सुमारे २०० मेंढ्या विषबाधमुळे दगवल्या. यामुळे मेंढपाळावर एक मोठे संकट ओढवले आहे.
मेंढपाळ काळुराम शिवाजी बरकडे हे वनकुट, ता. पारनेर, अहमदनगर येथून आपल्या २५० मेंढ्यांना घेऊन उपजीविकेसाठी देवघर, करंडोली, जेवरेवाडी, वाकसई, वेहरगाव भागात आले आहेत. त्यांचा वाडा करंडोली येथे आले. सोमवारी (दि. २९) सायंकाळी मेंढ्या चरुन आल्यानंतर रात्रीच्या सुमारास मेंढ्यांची पोट फुगु लागले व बघता बघता डोळ्यासमोर मेंढ्यांचा मृत्यू होऊ लागला.
ही घटना कळताच पशूवैद्यकिय अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन उपचार सुरु केले. परंतु मेंढ्या वाचू शकल्या नाहीत. करंडोली जेवरेवाडी ग्रामस्थांनी देखील होईल ती मदत देण्याचा प्रयत्न केला. ह्या दुर्दैवी घटनेमुळे मेंढपाळाला जो अर्थिक तोटा झाला आहे यासाठी सरकारकडून मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.