मुंंबई – महाराष्ट्रात शनिवारी सकाळी राजकीय भूकंप घडला. अजित पवारांना सोबत घेऊन भाजपने सत्तास्थापन केली. या सत्तास्थापनेविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सूरू असून महाविकास आघाडीचे वकील कपिल सिब्बल यांनी त्वरीत बहुमत चाचणी घेण्याचा आदेश द्यावा असा महत्त्वपूर्ण युक्तिवाद केला आहे.
Kapil Sibal appearing for Shiv Sena in Supreme Court, on joint plea of Shiv Sena,NCP&Congress against the decision of Guv inviting Devendra Fadnavis to form govt: At 5.17am y’day President’s Rule was revoked&at 8am 2 persons sworn-in as CM & Deputy CM. What documents were given?
— ANI (@ANI) November 24, 2019
न्यायालयात युक्तिवाद करताना कपिल सिब्बल म्हणाले की शनिवारी सकाळी ५:१७ महाराष्ट्रातून राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली. त्यानंतर ८ वाजता दोन व्यक्तींनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यासाठी कोणती कागदपत्रे देण्यात आली होती, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडीचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. त्याचबरोबर भाजपाकडं बहुमत आहेत, तर त्वरीत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी सिब्बल यांनी केली.