मुंबई – कंगना राणावत ही एक दमदार बॉलीवूड अभिनेत्री आहे, जी देशभरात सुरू असलेल्या सर्व मुद्यांवर आपले मत बिंदास मांडते. कंगनाने अशी अनेक विधाने केली असून त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर आपले मत ठाम ठेवण्यासाठी ओळखली जाणारी कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती देशातील मुद्यावरून चर्चेत आली नाही तर लग्नाच्या मुद्यावरून चर्चेत आली आहे.
कंगना सध्या लग्न करण्याच्या मूडमध्ये आहे. नुकतेच तिने ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. आता कंगना तिच्या आगामी अॅक्शन चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, कंगनाने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये तिने सांगितले की, तिला लग्न करायचे आहे आणि कुटुंब मला माझं कुटूंब हवं आहे.’
कंगनाने ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि ती वेळ माझ्या आयुष्यात येणार असेल तर ती येईल. मला लग्न करायचे आहे आणि मला माझे स्वतःचे कुटुंब हवे आहे..पण ते योग्य वेळीच होईल.’असं म्हणत कंगनाने लग्नाची इच्छा व्यक्त केली
इमरजेंसी चित्रपटा व्यतिरिक्त कंगनाकडे सध्या चंद्रमुखी 2 आणि तेजस सारखे चित्रपट आहेत. तिने इमर्जन्सी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले असताना आता ती तिच्या दुसऱ्या प्रोजेक्टच्या तयारीत व्यस्त आहे.