मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी रंगलेल्या शाब्दिक चकमकीदरम्यान अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. कंगनाच्या या वक्तव्यावरून तिच्याविरोधात राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच बीएमसीतर्फे कंगनाच्या कार्यालयावर कारवाईनंतर कंगनाची आई आशा रणौत यांनी हिंदी वृत्तवाहिनीशी बोलतानायांनी शिवसेनेवर टीका केली.
त्या म्हणाल्या की, “संपूर्ण देश आपल्या मुलीचं समर्थन करत आहे. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानते. माझ्या मुलीचं संरक्षण केल्याबद्दल भाजपाचे आभार”.
त्या पुढे म्हणाल्या की, ‘ १५ वर्षांपासून ती मुंबईत असून अर्ध आयुष्य तिने तिथंच घालवलं आहे. महाराष्ट्र हा सर्वांसाठी आहे . कंगना मुंबईतच राहणार आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी शिवसेनेवर त्यांनी टीका ही केली आहे.