मुंबई – अभिनेत्री कंगना राणावतने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर कंगना मुंबईत येण्यापूर्वीच पाली हिल परिसरात असलेल्या तिच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने तोडफोड केली होती. तेव्हापासून बीएमसी, शिवसेना आणि कंगना यांच्यात चांगलाच वाद निर्माण झाला आहे.
When individual stands against the government and wins, it’s not the victory of the individual but it’s the victory of the democracy.
Thank you everyone who gave me courage and thanks to those who laughed at my broken dreams.
Its only cause you play a villain so I can be a HERO. https://t.co/pYkO6OOcBr— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 27, 2020
या वादानंतर कंगनाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कंगनाच्या घरावर केलेल्या कारवाई प्रकरणी उच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टला फटकारलंय. कंगनाच्या कार्यालयावर झालेली कारवाई अवैध असून महापालिकेने यासाठी कंगनाला नुकसान भरपाई द्यावी असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. तसेच महापालिकेने या प्रकणाशी निगडित ज्या नोटिसा पाठवल्या होत्या, त्या रद्द करत असल्याचंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
The actress called Mumbai Police mafia & Mumbai PoK. Do parties which are excited over Court order agree with this? Indecent remarks about judges or Courts lead to contempt, is it not defamation when someone makes such remarks about Maharashtra/Mumbai?: Sanjay Raut, Shiv Sena https://t.co/Dkh3TOfyGp pic.twitter.com/Kj8E0apF3C
— ANI (@ANI) November 27, 2020
दरम्यान, याच पार्श्ववभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना पुन्हा एकदा खडा सवाल उपस्थित करत कंगनाच्या माफिया आणि पीओके वक्तव्याचाच मुद्दा अधोरेखित केला. “या अभिनेत्रीनं मुंबई पोलिसांना माफिया आणि मुंबईला पीओके म्हटलं होतं. न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत असणारे आता याच्याशी सहमत आहेत का?’, असं विचारत मुंबई आणि महाराष्ट्राविषयी अशोभनीय वक्तव्य करणं म्हणजे बदनामी नव्हे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.