नगर – तबलिगी जमातीच्या दिल्ली येथील मरकजच्या कार्यक्रमानंतर नगरमध्ये दाखल झालेल्या 26 परदेशी व तीन भारतीय अशा 29 नागरिकांना स्थानिक गुन्हे शाखेने 17 एप्रिलच्या रात्री अटक केली होती. यातील 26 परदेशी नागरिकांना 24 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांची मुदत शुक्रवारी संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मात्र परदेशी नागरिकांनी जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर शनिवार (दि.25) रोजी सुनावणी होणार आहे. करोना ने सर्वत्रच थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत हे सर्वजण पर्यटन व्हिसा घेऊन भारतामध्ये दाखल झाले. दिल्ली येथील मरकजच्या कार्यक्रमानंतर त्यांनी नगरमध्ये वास्तव केले.
पर्यटन व्हिसा असतांनी या सर्वांनी धर्मप्रसार केला, तसेच जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्या विरुद्ध जिल्ह्यातील भिंगार कॅम्प, जामखेड, नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन असलेल्या 26 परदेशी व तीन भारतीय अशा 29 नागरिकांना त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्याने अटक करण्यात आली आहे.