मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची नुकतीच ठाण्यात उत्तर सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कडाडून टीका केली. राज यांनी राष्ट्रवादीच्या आघाडीच्या सर्व नेत्यांवर हल्लाबोल केला. त्यात त्यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या चेहऱ्यावर टिप्पणी केली. आव्हाडांनी आज राज ठाकरेंना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं.
नागाने फणा काढावा असा जितेंद्र आव्हाडांचा चेहरा असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. यावेळी राज यांनी अनेक नेत्यांची मिमकरी करत शरद पवारांवर जोरदार टीका केली. त्यामुळे संतापलेल्या आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे म्हणतात, शरद पवार केवळ फुले-शाहु-आंबेडकर यांचंच नाव घेतात. महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली. शिवजयंती साजरी करून पहिला पोवाडा त्यांनी लिहिला. तर बाबासाहेब आंबेडकरांनी तर संविधान लिहिलं. या तिघांच्या विचारात शिवाजी महाराज होते. पण राज ठाकरे हे तुम्हाला नाही समजणार असं आव्हाड म्हणाले.
राज ठाकरे इतरांच्या चेहरा, नाक, रंगावरून टीका करतात. तुमच्यात वर्णद्वेष, जातीवाद किती भरला हे दिसून येत. व्यंग किंवा वर्ण कधी काढायचा नसतो. तुमचं तोंड किती सुजल असं मी म्हटल तर चालेल का तुम्हाला, असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला.