मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतची माहिती स्वतः शरद पवार यांनी दिली. लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. शरद पवारांच्या निवृत्तीची घोषणा होताच अनेक कार्यकर्त्यांनी निर्णय मागे घेण्याची त्यांना विनंती केली. याबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देखील अश्रू अनावर झाले.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी इतर नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अजित पवार,छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर जयंत पाटील बोलू लागले मात्र त्यांना अश्रू अनावर झाले. काही काळ ते थांबले पुन्हा बोलू लागले. मात्र त्यांना हुंदका आवरता आला नाही.
जयंत पाटील म्हणाले,”साहेब तुम्ही निर्णय मागे घ्या तुम्हाला जी भाकरी फिरवायची ती फिरवा.मीही काही बोलणार नाही.आम्ही सर्व राजीनामे देतो.आमच्या सर्वांचे राजीनामे घ्या. पण तुम्ही पक्षाच्या अध्यक्षपदावरून जाऊ नका. अध्यक्षपदी कायम राहा” अशी विनंती पाटील यांनी यायला केली.
काय म्हणाले शरद पवार नेमकं यावेळी
मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहे. कुठं थांबायचं हे मला माहिती आहे. त्यासाठी मी जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची लवकरच बैठक बोलवणार आहे.” तसेच संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितले.