Jayant Patil – अजित पवार (Ajit Pawar) गटातील 15 आमदार हे आपल्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. या आमदारांना परत सोबत घ्यायचे की नाही याचा अंतिम निर्णय शरद पवार (shard pawar) घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पाटील पुढे बोलताना म्हणाले की, पक्ष आणि चिन्हच्या संदर्भात अजित पवार गटात गोंधळ आहे. त्यांना वाटले होते की, आपल्याला पक्ष आणि चिन्ह मिळून जाईल. पण तसे झाले नाही. आपल्या पक्षाचा खालचा कार्यकर्ता हा कुठे ही गेला नाही.
त्यामुळे याची दखल निवडणूक आयोगाला देखील घ्यावी लागली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुणे जिल्ह्याची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन भाषणावेळी हा दावा केला आहे.
शरद पवार यांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीला शिराळा मतदारसंघाचे आमदार मानसिंह नाईक हे देखील उपस्थित आहेत. मानसिंह नाईक यांनी अजित पवार गटाला समर्थन दिले होते. आता मानसिंह नाईक शरद पवारांच्या बैठकीसाठी आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर पक्षात उभी फूट पडली. शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पक्षात तयार झाले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील अनेक बड्या नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.