जामखेड : रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरमध्ये प्राचार्य नाही, प्राध्यापक नाही, त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण बंद आहे. अशा कॉलेजमध्ये विद्यार्थी राहु शकतील का? हा ऐरणीचा प्रश्न आहे. सध्या संपूर्ण परीक्षेचा कालावधीत सुरू झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थींचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची जबाबदारी विद्यापीठ घेईल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीचे अध्यक्ष डॉ. संदीप पालवे यांनी उपोषणकर्ते विद्यार्थींना दिले.
गेल्या चार दिवसांपासून रत्नदीप मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर विद्यार्थींचे व शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांचे उपोषण सुरू आहे. उपोषणकर्त्यांना आज दि ८ रोजी दुपारी बारा वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्यशोधन समितीचे अध्यक्ष डॉ. संदीप पालवे, डॉ.अमोल घोलप, प्रा. जी.वाय दामा यांच्या समितीने भेट दिली.
पुढे बोलताना समितीचे अध्यक्ष डॉ. पालवे म्हणाले की, या कॉलेजचा विषय खुपच गंभीर आहे पालकांच्या समाज्याच्या भावना तीव्र आहेत, आनेक प्रश्न आहेत विद्यार्थींच्या पैशाचा प्रश्न आहे माणसिकतेचा, छळवणूकीचा प्रश्न आहे, हे सर्व प्रश्न वेगवेगळे आहेत. यासाठी वेगवेगळ्या समित्या नेमून सखोल चौकशी करावी लागणार आहे. या विद्यार्थ्यांची दखल घेतली असून विद्यार्थींना न्याय देण्याचे काम समिती करणार आहेत.
या कॉलेजची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाने बी फार्म सीच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया बंद केली आहे. परीक्षेच्या दुष्टीने विद्यार्थींचे नुकसान होऊ न देता त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन आंदोलकांन समोर कमीटीचे अध्यक्ष डॉ. संदीप पालवे यांनी दिले.
यावेळी बोलताना उपोषणकर्ते पांडुराजे भोसले बोलताना म्हणाले की, महिला दिना दिवशी मुली उपोषण करत असताना खा. सुजय विखे आ. रोहित पवार व आ.राम शिंदे यांनी या घटनेकडे लक्ष दिले पाहिजे होते. मात्र अजुन कोणताही लोकप्रतिनिधी उपोषणाकडे फीरकला नाही. तसेच लवकर गुन्हा दाखल न केल्याने पोलीस प्रशासनावर देखील पांडुराजे भोसले यांनी ताशेरे ओढले. यावेळी संभाजी ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, केदार रसाळ, रमेश (दादा) आजबे, हवा सरनोबत सह अनेकांनी देखील आपल्या तक्रारी समितीच्या सदस्यांन समोर मांडल्या
यानंतर दुपारी सदरच्या पथकाने दुपारी तीन वाजता रत्नदीप मेडिकल फौंडेशन अँड रिसर्च सेंटरची चौकशी केली असता कॉलेजमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. यामध्ये सहा लॅब समिती सदस्य तहसीलदार गणेश माळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या सहीने सील करण्यात आले. हा संपुर्ण अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याची माहिती समितीने दिली आहे. समितीसमोर आपल्या भावना व्यक्त करताना मुलींना अश्रू अनावर झाले होते. यावेळी संपूर्ण ग्रामस्थ देखील भावना विवष झाले होते.