Ritesh Deshmukh : मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. मोठ्या संख्येने लोकांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. अनेक गावांमध्ये पुढाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यातच आता अभिनेता रितेश देशमुख ( Ritesh Deshmukh) याने देखील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. याबाबत रितेश देशमुखने एक पोस्ट शेअर केली आहे.
रितेशने ट्वीट करत लिहिले की, “जय शिवराय, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय्य मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो.” यावेळी रितेश देशमुखने मनोज जरांगे यांना तब्येतची काळजी घेण्याचेही आवाहन केले.
जय शिवराय,
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय्य मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो. आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो. 🙏🏽 pic.twitter.com/Qffzej8Y4k— Riteish Deshmukh (@Riteishd) October 30, 2023
आंदोलनाला हिंसक वळण
दरम्यान, एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना दुसरीकडे मराठवाड्यातील बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. 30 ऑक्टोबर रोजी मराठा आंदोलकांना आक्रमक भूमिका घेत बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर आणि माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंखे यांच्या घरांची जाळपोळ झाली.
मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. शिंदे समितीने 1 कोटी 72 लक्ष नोंदी या समितीने तपासल्या आहेत. त्यात 11 हजार 530 नोंदी मिळाल्या आहेत. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना दाखले देणार आहोत. याबाबत तहसीलदारांची बैठक घेऊन उद्यापासूनच दाखले द्यायला सुरू करणार आहोत. मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे समितीने एक प्रथम अहवाल सादर केला आहे, कॅबिनेटमध्ये स्वीकारून पुढची प्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगितले होते.
त्यावर प्रतिक्रिया देत मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगितले. तसेच आंदोलन पुढे सुरूच ठेवणार असल्याचे देखील स्पष्ट केले,.