मुंबई – अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्ती आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून साडेतीन कोटी रुपये किमतीची जमीन केवळ 20 लाख रुपयांत नवाब मालिक यांनी खरेदी केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केला.
तसेच, हसिना पारकर यांचा खास माणूस असणारा सलीम पटेल कोण होता, त्याने इतक्या कमी किमतीत जमीन का विकली? असे सवालही त्यांनी उपस्थित केले.
यावर आज नवाब मलिक आणि त्यांचा मुलगा फराज मलिक यांनी हा व्यवहार मान्य केला असला तरी त्यातील अंडरवर्ल्डशी कनेक्शनचा आरोप फेटाळून आला आहे.
अशातच भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. त्यांनी ट्विटमध्ये उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला आहे की,’ खरं तर आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय. शिवसैनिक हे करणार का? नाहीतर मीच जाऊन शिंपडतो…’ असा प्रश्न ही त्यांनी विचारला आहे.
काय आहे नितेश राणे यांचे ट्विट
९३ च्या दंगलीत बाळासाहेबांनी हिंदूंना वाचवलं…
आता त्यांचाच मुलगा ९३ दंगलीच्या आरोपींचा पार्टनर असलेल्या मंत्र्याबरोबर मांडीला मांडी लाऊन सत्ता उपभोगतोय…
खरं तर आता बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आलीय.शिवसैनिक हे करणार का? नाहीतर मीच जाऊन शिंपडतो…
— nitesh rane (@NiteshNRane) November 10, 2021