पुणे – गेल्या काही दिवसांपासून राज्यात नवीन कोविड रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे ही आनंदाची बाब आहे. राज्यातील बहुतांश नागरिकांचे लसीकरणही झालेले आहे. मात्र, लसीकरणानंतरही मास्क परिधान करणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सोशल डिस्टंसिग या त्रिसूत्रीचा वापर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डाॅ. भार्गवी बडे यांनी केले. पत्रकार भवन येथे कोविड एक्सलंस पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी महात्मा गांधी जयंती व लाल बहाद्दुर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुणे पत्रकार भवन येथे इंटरनॅशनल टी. मेडिसीन समिती व सिफा संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या एक्सलंन्स पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी आय ए एम चे अध्यक्ष डाॅ. अविनाश भोंडवे, डाॅ. राजन संचेती, डाॅ. राजकुमार शहा, आय ए एम चे सचिव डाॅ. पवार, बालरोगतज्ज्ञ डाॅ. विजय बडे, डाॅ. धनंजय नील यांना कोविड अॅवार्ड पुरस्कार देण्यात आला. तसेच कोविड काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध संस्थांना सन्मानित करण्यात आले.