पिरंगुट, (वार्ताहर) -माणसाच्या जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व आहे. मुलांबरोबर मुलींना शिक्षण देणे तितकेच महत्वाचे आहे, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.
श्री विद्याभवन शाळेचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून रूपाली चाकणकर व ज्योती कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी त्या बोलत होत्या. मिनी केजी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रेरणा देणारे असे नृत्य सादरीकरण केले. यामध्ये झाशीची राणी, छत्रपती श्री शिवाजी महाराज, शिक्षण प्रसारक, व देश प्रेम, शंकर तांडव, आई, वडील, स्त्रियांची वेगवेगळी रूपे, तानाजी मालुसरे – गड आला पण सिंह गेला असे थरारक नृत्य प्रेरणा देणारे हे यावर्षीचे स्नेहसंमेलनाचे आकर्षण ठरले.
या कार्यक्रमात विशेष म्हणजे श्री विद्या भवन शाळेबद्दलच्या भावना गीत गायनात सादर करण्यात आल्या. या गीतात सर्व शाळेची प्रशंसनीय कामगिरी याचे वर्णन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे अभ्यासामध्ये प्रगती केलेल्या पहिल्या दोन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी शंकर मांडेकर, शांताराम इंगवले, रामभाऊ पवळे, राम गायकवाड, भाऊ आखाडे, संतोष पवळे, भानुदास गोळे, वैभव पवळे, रवींद्र गरुड, स्वाती गोळे, यशवंत लोयरे, शेखर मोहकर, विकास पवळे, महेश वाघ, प्राचार्या सुचित्रा साठे, वृषभ साठे, पूजा साठे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या प्राचार्या सुचित्रा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहलता रामाने, उज्वला कचरे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते. सूत्रसंचालन संतोष गावडे, अपर्णा मारणे, पूनम शितोळे व विद्यार्थ्यांनी केले.