मुंबई – नेतृत्व काढल्याने निराश झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम देत रोहित शर्माने हार्दिक पंड्याचे कौतुक केले आहे. पंडयाच्या संघातील समावेशामुळे संघात जोश आला आहे. सगळे खेळाडू नव्या मोसमासाठी सज्ज होत आहेत. जे काही घडले त्याचा खेळाडूंशी काही संबध नसतो. काही निर्णय संघ मालक व व्यवस्थापनाचे असतात व तूम्ही जर संघाचे सदस्य आहात तर ते मान्य करणे बंधनकारक असते. असं रोहित शर्मानं म्हटलं आहे.
पुढे तो म्हणाला की, बाकी पंडयाबाबत बोलायचे झाले तर त्याने गुजरातचे नेतृत्व दोनवेळा करताना एकदा विजेतेपद मिळवून दिले तर एकदा अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले. त्यामुळे त्याच्या नेतृत्वात पुढील मोसमात मुंबई संघ सरस कामगिरी करेल, असा विश्वासही रोहित शर्मांने व्यक्त केला.
दरम्यान, मंगळवारी दुबईतील कोका-कोला एरिना येथे आयपीएल लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. या लिलावात खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात पैशांचा वर्षाव करण्यात आला. आता आयपीएल लिलावानंतर सर्व संघ आगामी हंगामासाठी सज्ज झाले आहेत.मुंबई इंडियन्ससह सर्व संघांचे संघ पूर्ण झाले आहेत. मुंबईने 8 खेळाडूंची खरेदी केली.
मुंबई इंडियन्स –
रिटेन खेळाडू : हार्दिक पंड्या (कर्णधार) रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ आणि रोमॅरियो शेफर्ड.
ऑक्शनमधील खेळाडू : जेराल्ड कोएत्झी (5 कोटी), दिलशान मदुशंका (4.6 कोटी), नुवान तुषारा (4.8 कोटी), मोहम्मद नबी (1.5 कोटी),श्रेयस गोपाल (20 लाख), नमन धीर (20 लाख), अंशुल कंबोज (20 लाख), शिवालिक शर्मा (20 लाख)