T20 World Cup 2024 & Hardik Pandya : अलीकडेच एकदिवसीय विश्वचषकादरम्यान हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. मात्र, त्यानंतर हा अष्टपैलू खेळाडू आयपीएलमधून परतला, पण त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. मात्र, टी-20 विश्वचषकासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. हार्दिक पांड्या या टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. यानंतर हार्दिक पांड्याच्या निवडीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, हार्दिक पांड्याची निवड दबावाखाली करण्यात आली आहे, पण या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे? या प्रश्नाचे उत्तर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिले आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना टी-20 विश्वचषक संघ निवडीबाबत विचारले असता ते म्हणाले की, “खेळाडूंची निवड केवळ आयपीएलच्या कामगिरीच्या आधारे केली गेली नाही. याशिवाय इतरही अनेक बाबी विचारात घेतल्या आल्या आहेत. विशेषत: एखाद्या खेळाडूला आंतरराष्ट्रीय अनुभव किती आहे…. हार्दिक पांड्याची दबावाखाली निवड झाल्याचे सर्व दावे त्याने फेटाळून लावले. तसेच, जय शाह यांनी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाबाबत आपले मत व्यक्त केले.
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाबद्दल जय शाह म्हणाले की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ उत्कृष्ट आहे. अनुभवी खेळाडूंशिवाय युवा खेळाडूंचा चांगला मेळ आहे. निवडकर्त्यांनी या स्पर्धेसाठी खेळाडूंच्या निवडीवर केवळ आयपीएलचा आधार घेतला नाही तर विशेषत: या खेळाडूंनी परदेशी भूमीवर किती सामने खेळले आहेत, या खेळाडूंना किती आंतरराष्ट्रीय अनुभव आहे? यासारख्या अनेक गोष्टी लक्षात घेत संघ निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अलीकडेच टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या खेळाडूंच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील 15 सदस्यीय संघात हार्दिक पांड्याला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.