मुंबई – दिल्ली कॅपिटल्स संघाला यंदाच्या आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांत संमिश्र यश मिळाले आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांनी विजय मिळवला तर गुजरात टायटन्सकडून पराभव पत्करला. मात्र, तरीही संघाचे प्रशिक्षक रिकी पॉंटिंग यांनी संघ पुढील सामन्यांत चमकदार कामगिरी करेल असा विश्वास आहे.
पहिल्या दोन सामन्यांवरुन कोणत्याही संघाचे समिक्षण करु नये. अजून खूप सामने बाकी आहेत, खेळाडूंना रुळण्यासाठी थोडा वेळ देण गरजेचे आहे. येत्या काही दिवसांची मिळालेली विश्रांती खेळाडूंच्या पथ्यावरच पडणार असून त्यांना आपल्या चुका दुरुस्त करण्यासाठी नेटमध्ये सरावादरम्यान संधीही मिळणार आहे, असेही पॉंटिंगने सांगितले.