मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्यावर बीसीसीआयने जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरेल, असा विश्वास बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी व्यक्त केला आहे.
रवी शास्त्री यांची मुदत संपल्यावर द्रविडची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती तेव्हा त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल संघ ठरेल असी आमची अपेक्षा होती, सध्या संघाची कामगिरी पाहता हे लक्ष्य लवकरच पूर्ण होइल.
द्रविड एक खेळाडू असताना जास्त गंभीरपणे विचार करणारा नव्हता पण जेव्हा तो प्रशिक्षक बनला तेव्हा त्याने परिस्थितीचा विचार करणे, खेळाडूंची क्षमता व त्यांच्याकडून कशी कामगिरी करुन घ्यायचा अभ्यास सुरु केला, असेही गांगुली यांनी सांगितले आहे.