आबुधाबी – रोहित शर्माचा मुंबई इंडियन्सचा संघ आज दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार आहे. दोन्ही संघांकडे पॉवर हिटर्स फलंदाज असले तरीही त्यात मुंबईच्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान दिल्लीच्या गोलंदाजांसमोर राहणार आहे.
मुंबई विरूध्द दिल्ली या सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आहे. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
NEWS from Abu Dhabi.@DelhiCapitals have won the toss and they will bat first against @mipaltan #Dream11IPL pic.twitter.com/TEtO3Fet0N
— IndianPremierLeague (@IPL) October 11, 2020
दरम्यान, स्पर्धेच्या गुणतालिकेत दिल्ली संघाचे 10 गुण तर मुंबईचे 8 गुण आहे. दोन्ही संघ अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. दिल्लीने आतापर्यंत 6 सामने खेळले असून त्यापैकी 5 सामन्यात विजय साकारला आहे. मुंबईला 6 सामन्यापैकी 4 सामन्यात विजय मिळविता आला आहे. आजचा सामना जिंकून गुणतालिकेत प्रथम स्थानी राहण्याचा दिल्लीचा मानस असेल तर मुंबईसुध्दा विजय साकारून गुणतालिकेत आघाडीवर जाण्याचा प्रयत्न करेल.