नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) जर इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) खेळवायची असेल तर आता आणखी एक अडथळा पार करावा लागणार आहे. ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आता मंडळाला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे केंद्रीय क्रीडा मंत्री किरम ऱिजीजू यांनी स्पष्ट केले आहे.
ही स्पर्धा येत्या 29 पासून सुरु होणार होती, मात्र देशभरात करोना विषाणूंचा धोका वाढल्याने ही स्पर्धा 15 एप्रिलपासून सरू करण्याचे निश्चित करण्यात आले होते.
करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्यामुळे आता ही स्पर्धा होणार का असाही प्रश्न निर्माण झाला आहे. क्रीडा मंत्र्यांनी परवानगी दिली नाही तर मंडळाला स्पर्धा किमान देशात तरी घेता येणार नाही.