नवी दिल्ली – सप्टेंबर महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर वाढवून 7.34 टक्के झाला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये या महागाईचा दर 6.69 टक्के होता. अन्नधान्याच्या किमती वाढल्यामुळे एकूण महागाईचा दर वाढला आहे.
दरम्यान, ऑगस्टमध्ये औद्योगिक उत्पादन 8 टक्क्यांनी कमी झाले. या महिन्यात आणि मॅन्युफॅक्चरिंग, खान क्षेत्राची उत्पादकता कमी होण्याबरोबरच वीजनिर्मिती कमी झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादन 1.4 टक्क्यांनी कमी झाले होते.