बेंगळुरु – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारताचा कर्णधार व यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याच्या नावावर एक नकोशी कामगिरी नोंदली गेली आहे. या पाच सामन्यांच्या मालिकेत पंतने सर्व सामन्यात नाणेफेक गमावली आहे, त्यामुळे ही काहीशी वेगळी कामगिरी ठरली आहे.
पंतला या मालिकेत एकाही सामन्यात नाणेफेक जिंकता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार थेम्बा बावुमा दुखापतीने अखेरच्या सामन्यात खेळू शकला नव्हता त्यामुळे त्याच्या जागी केशव महाराज याने नेतृत्व केले.
पाचही सामन्यांमध्ये भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली आणि सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाने आपल्या संघात कोणताही बदल केला नाही. कोणत्याही 5 सामन्यांच्या मालिकेत सलग सर्व नाणेफेक गमावण्याचा विक्रम पंतच्या नावावर आहे. या मालिकेत 2-2 अशी बरोबरी झाली व दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले गेले.