मुंबई – रवीचंद्रन अश्विनची कामगिरी कौतुकास्पद झाली असून त्याने या अष्टपैलू कामगिरीने स्वतःला सिद्ध केले, अशा शब्दांत विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी अश्विनचे कौतुक केले आहे.
अश्विन संघाची गरज ओळखून गोलंदाजी करतो. फलंदाजांना अडचणीत आणणे व अचानक एखाद्या अनपेक्षित चेंड टाकून त्यांना बाद करण्याची कला त्याच्याकडे आहे. या कसोटी मात्र, त्याने फलंदाजी भारताच्या इतर फलंदाजांचे मनोधैर्य वाढवणारी होती. त्याच्या नावावर चार कसोटी शतके होती. पण नंतर त्याने गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन शतक फटकावणे खूप मोठी गोष्ट आहे, असेही गावसकर म्हणाले.
अश्विनने साकार केलेले शतक हे त्याच्या नैसर्गिक लढावूवृत्तीला सिद्ध करणारे आहे. गोलंदाजीत पाच बळी मिळवल्यानंतर अश्विनला विचारण्यात आले होते की खेळपट्टी कशी आहे? फलंदाजांनी थोडा संयम दाखवला तर त्यांना धावा करणे शक्य आहे असे अश्विन म्हणाला होता. त्यावेळी अनेकांनी त्याच्यावर टीकाही केली होती. मात्र, त्याने स्वतःच शतकी खेळी करत त्याचे मत सिद्ध केले. यालाच खेळाडूचा स्वतःवरचा विश्वास म्हणतात, असेही गावसकर म्हणाले.