मुंबई -ऑस्ट्रेलियाचा संघ सप्टेंबर महिन्यात भारतात टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी येणार असल्याची माहिती बीसीसीआयने जाहीर केली. येत्या ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होणार असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व असून या मालिकेद्वारे दोन्ही संघांना चांगला सराव मिळणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झिम्बाब्वे तसेच न्यूझीलंड यांच्याशी एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. सामन्यांचे वेळापत्रक येत्या काही दिवसांत जाहीर केले जाणार आहे.
ऑस्ट्रेलियात येत्या 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर या कालावधीत टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. सप्टेंबरमध्ये टी-20 मालिका खेळल्यावर विश्वकरंडक व काही मालिका होणार असून त्यानंतर पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा भारतात चार सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात योणार आहे.
हे कसोटी सामने फेब्रुवारी आणि मार्चमध्ये खेळवले जाणार असून ही मालिका आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असेल. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 2017 साली भारताचा दोरा केला होता.