कोलकता – येथे झालेल्या वेस्टइंडीज विरुद्धच्या टी -२० सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने विजय मिळविला. तीन सामन्यांच्या मालिकेत भरताने दुसऱ्या सामन्यात विंडीजचा ८ धावांनी पराभव केला. या विजयाने भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. विराट कोहली, रिषभ पंत आणि वेंकटेश अय्यरच्या फटकेबाजीनंतर अखेरच्या षटकांत गोलंदाजांनी राखलेल्या अचूकतेमुळे भारताने विजय साकार केला.
भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १८६ धावा केल्या. विराट कोहली आणि रिषभ पंतच्या ५२ धावा भारताच्या डावात महत्वाच्या ठरल्या. त्यांना वेंकटेश अय्यरचीही साथ मिळाली. आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा डाव ३ बाद १७८ असा मर्यादित राहिला. रोवमॅन पॉवेल आणि निकोलस पूरन यांनी अनुक्रमे नाबाद ६८ आणि ६२ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक –
भारत २० षटकांत ५ बाद १८६ (विराट कोहली ५२ (४१), रिषभ पंत ५२ (२८), वेंकटेश अय्यर ३३ (१८), रोस्टन चेस ३-२५) वि.वि. वेस्ट इंडिज ३ बाद १७८ (निकोलस पूरन ६२- ४१ चेंडू, ५ चौकार, ३ षटकार, रोवमॅन पॉवेल नाबाद ६८ – ३६ चेंडू, ४ चौकार, ५ षटकार, भुवनेश्वर १-२९)
Share this :