द हेग – कचरा आणि प्रदुषण कमी करणे आणि वृक्षारोपण करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी भारतीय बंधूंनी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे.
दिल्लीतील रहिवासी असलेल्या विहान आणि नव अगरवाल असे या बंधूंचे नाव आहे. त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी त्यांना बालकांसाठीचा शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतातील नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांच्या हस्ते विहान (वय 14 वर्षे) आणि नव (वय 7 वर्षे) या बंधूंना आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नेदरलॅन्डमधील द हेग येथे आयोजित कार्यक्रमात या बंधूंना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विहान आणि नव अगरवाल या बंधूंनी कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचा “वन स्टेप ग्रीनर’ नावाने एक प्रकल्प सुरू केला आहे. 2017 मध्ये दिल्लीतील गाझीपूर कचरा डेपोला आग लागल्याने दुसऱ्या दिवसी संपूर्ण शहरात प्रदुषण निर्माण झाले होते. त्यावेळी या दोघांना या प्रकल्पाची कल्पना सुचली. सततच्या खराब हवेमुळे विहानला घरातच रहावे लागे.
“वन स्टेप ग्रीनर’या स्वयंसेवी संस्थेद्वारे दिल्लीतील 1,500 घरे, शाळा आणि कार्यालयातील कचरा रोज गोळा केला जातो. या कामात आता अनेक स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या कचऱ्यावर प्रक्रियाकरून त्याचा फेरवापर केला जातो. वृक्ष लागवडीसाठी विनियोग केला जातो.
आपल्यालाला मिळालेल्या पारितोषिकाच्या रकमेचा विनियोग आपल्या उद्देसाची व्याप्ती देशात आणि परदेशातही करण्यासाठी करणार असल्याचे या बंधूंनी सांगितले. जगातील कचऱ्याचे प्रमाण व्हावे असे आपल्याला वाटते. हा संदेश केवल बारतातच नव्हे, तर प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात आणि जगभरात पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचेही विहान अगरवाल यांने सांगितले.