मुंबई : सुधारीत नागरीकत्व कायदा (का) करून स्वत:हून भारताने एकाकी पाडून घेतले. देशांत आणि परदेशातही त्याविरोधात उमटणारी टीकेची धार दीर्घ काळ चालेल, अशा शब्दात माजी परराष्ट्र सचीव शिवशंकर मेनन यांनी सरकारला खडे बोल सुनावले. भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोनच या कायद्यामुळे बदलला असल्याचे त्यांनी सांगितले.
या वादग्रस्त कायद्यामुळे देशव्यापी निदर्शने सुरू झाली. त्याबाबत विचार करण्यासाठी बुध्दीवाद्यांची परिषद घेण्यात आली. त्यात मेनन बोलत होते. ते म्हणाले या एका गोष्टीने भारत जगात एकाकी पडला आहे. आंतरराष्ट्रीय समुदायातून उमटलेली टीकेची धार दीर्घ काळ चालेल. गेल्या काही महिन्यात भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला गेला आहे. अगदी आमच्या मित्रांनीही माघार घेतली आहे.
अलीकडच्या काळात आपण काय कमावले, तर भारताची तुलना पाकिस्तान सारखी असहिष्णू राष्ट्र म्हणून बनवली. अशा पध्दतीने यापुर्वी जग आपल्याकडे कधीही पहात नव्हते, असे ते म्हणाले. पण आम्ही अशी कृती (का) करण्याचा आणि स्वत:लाच एकाकी पाडून घेण्याचा निर्धार केला होता आणि ही बाब कोणासाठीही चांगली नाही.
आंतराष्ट्रीय कराराचे आम्ही उल्लंघन केल्याचे चित्र त्यातून उभे राहीले. ज्यांना आंतराष्ट्रीय कायदे बंधनकारक नसतात असे वाटते त्यांनी आंतरराष्ट्रीय करारांच्या उल्लंघनाने होणाऱ्या परिणामांचा विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
प्रेस क्लबमध्ये या कार्यक्रमात झोरा हसन, निरजा जयाल आणि फैझन मुस्तफा सहभागी झाले होते.