नवी दिल्ली: करोनाशी मुकाबला करायचा तर त्याच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे, पण भारत त्याबाबतीत खूपच मागे आहे अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
भारतात करोना संशयितांच्या करोनाच्या अनुषंगाने चाचण्या घेण्याचे प्रमाण खूपच कमी आहे, असे नमूद करून राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, देशात प्रती दहा लाख व्यक्तींमागे केवळ 149 चाचण्या घेतल्या जात असून हे प्रमाण लाओस, नायगर, होंडुरास या मागास देशांइतकेच आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
भारताने करोना चाचणी कीट घ्यायला खूप उशीर केला आणि आता त्याची देशात मोठी टंचाई आहे. करोना रोखायचा तर संशयितांच्या चाचण्या घेणे महत्त्वाचे आहे पण त्या बाबतीत भारताची स्थिती नोव्हेअर ईन गेम अशी आहे अशी टिपण्णीही राहुल गांधी यांनी केली आहे.