मास्क वापरणे बंधनकारकच
रेडा(प्रतिनिधी) :- इंदापूर तालुका लॉकडाऊन असताना, पॉझिटिव्ह कोरोना पेशंटची संख्या अतिशय नगण्य होती. मात्र शासनाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सूचनांकडे जर तालुक्यांमध्ये कानाडोळा होत असेल,सूचनांचे पालन करणार नसाल तर इंदापूर तालुका पुन्हा लॉक डाऊन केला जाईल. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1319990898340612/
पुढे माहिती देताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,इंदापूर तालुक्यातील नागरिकांनी कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, मागील काही महिन्यांमध्ये प्रचंड सहकार्य केले आहे. याच पद्धतीने आगामी कालावधीत देखील सहकार्य अपेक्षित आहे.मात्र सध्या तालुक्यांमध्ये 1000 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असल्यामुळे व जवळपास 480 रुग्ण उपचार घेत असल्यामुळे खबरदारी म्हणून शासनाने आखून दिलेले नियम तंतोतंत पालन केले जावेत अशी अपेक्षा शासनाची आहे.
इंदापूर तालुक्यातील पोलिसांच्या माध्यमातून विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी, मोहीम यशस्वीरित्या चालू आहे.असे असले तरी देखील स्वतःच्या कुटुंबाची व तालुक्याची काळजी घेण्यासाठी शासनाचे नियम व स्वतःचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी,मास्क वापरण्याने सेनीटायझर वापरणे गरजेचे आहे, असेही आवाहन राज्यमंत्री भरणे यांनी केले.
इंदापूर तालुक्यातील प्रशासनाला साथ देण्याची भूमिका नागरिकांनी मागील लॉकडाऊन कालावधीमध्ये घेतली गेली होती त्यामुळेच इतर तालुक्या मधील पॉझिटिव्ह पेशंट पेक्षा इंदापूर तालुक्यामध्ये कमी पॉझिटिव्ह पेशंट सापडले होते. इथून पुढचा कालावधी अत्यंत प्रचंड खबरदारी घेऊन,काळजी न करता आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे.यासाठी जर पॉझिटिव्ह पेशंटची संख्या वाढत असेल तर लॉक डाऊन पुन्हा केले जाईल.त्यामुळे तालुक्यातील व्यापारी,छोटे मोठे व्यावसायिक आणि नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचना अत्यंत काळजीपूर्वक पाळणे गरजेचे आहे. अशीही माहिती राज्यमंत्री भरणे यांनी दिली.