हैदराबाद – भारत व इंग्लंड या दोन्ही संघांचे सोमवारी येथे रात्री उशिरा आगमन झाले. त्यानंतर लगेचच दोन्ही संघांनी मंगळवारी ठरावीक वेळेत नेटमध्ये कसून सराव केला. भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्मासह तर इंग्लंड संघाने कर्णधार बेन स्टोक्ससह बैठक घेऊन चर्चा केली व त्यानंतर सराव सत्र घेण्यात आले.
भारताशी स्पर्धा करणे इंग्लंडसाठी सुकर असणार नाही. भारतीय संघ ही मालिका घरच्या मैदानावर खेळणार आहे. त्याचा फायदा भारताला होणार आहे. इंग्लंडकडे ज्यो रूट आणि जॉनी बेअरस्टोसारखे अनुभवी खेळाडू आहेत. परदेशी भूमीवरही त्यांची कामगिरी चांगली आहे. तसेच त्यांच्या संघात बेन डकेट आणि जॅक क्राउली यांचाही समावेश आहे.
इंग्लंडची गोलंदाजीही अनुभवी असून भारताचे नवोदित फलंदाज त्यांचा कसा सामना करता यावर भारतीय संघाचे यशापयश अवलंबून राहणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना २५ जानेवारीपासून येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेत पाच सामने खेळवले जाणार आहेत.
दोन्ही संघ खालील प्रमाणे –
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, महंमद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) आणि आवेश खान.
इंग्लंड संघ – बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, शोएब बशीर (व्हिसा मिळाला तर खेळणार), जॅक क्राउली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, ज्यो रूट आणि मार्क वुड.