IND vs AUS – भारतीय संघाने आज ब्रिस्बेन येथे टी-२० विश्वचषकातील पहिला सराव सामना यजमान ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळला. या सामन्यात भारतीय संघाने ६ धावांनी विजय नोंदवला. मात्र भारताच्या विजयापेक्षा सध्या मोहम्मद शमीच्या त्या शेवटच्या एका षटकाची जोरदार चर्चा सुरु आहे. शमीच्या एका षटकाची चर्चा होण्यामागचे कारणही तसेच वेगेळे आहे. कारण शमीने संपूर्ण सामन्यात फक्त एकच षटक टाकले आणि तेही २०वे होते. मात्र या षटकात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीने कमालच करून दाखवली.
#T20WorldCup । काय ती विराटची फिल्डिंग, काय तो त्याने घेतलेला कॅच; सगळं एकदम ओक्के…
भारतीय संघाने दिलेल्या १८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाला शेवटच्या षटकात ११ धावांची गरज होती. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मोहम्मद शमीच्या हातात चेंडू दिला. एक वेळ सगळ्यांना वाटले असावे की, भारताने आता सामना गमावला. मात्र शमीच्या पहिल्या दोन चेंडूत कांगारूंनी ४ धावा काढल्या. यांनतर खरे नाट्य घडे ते म्हणजे पुढील चार चेंडूत ४ गड्यांना बाद करण्यात शमीला यश आले. यामध्ये एक धावबाद, एक विराटकरवी झेलबाद आणि दोन त्रिफळाचित असे गडी बाद केले.
Mohammed Shami bowled a world class 20th over. Just brilliant how accurate he was with his bowling, great signs for India ahead of the group matches.
2,2,W,W,W,W by Shami in the 20th over while defending 11 runs.#INDvsAUS #Shami pic.twitter.com/IoZcOuwOQ2
— Syed Aamir Quadri (@aamir28_) October 17, 2022
जसप्रीत बुमराहच्या दुखापतीनंतर बऱ्याच दिवसांनी बीसीसीआयने मोहम्मद शमीच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की, शमी खरंच बुमराहाची कमतरता भरून काढेल का? मात्र त्याच्या आजच्या कामगीरीमुळे शमीचे चाहते सर्वात जास्त खुश असणार आहेत. एका मोठ्या ब्रेकनंतर मोहम्मद शमीने टी-२० संघामध्ये पुनरागमन केल आहे. एका षटकात शमीची भेदक गोलंदाजी पाहून सगळ्यांच्याच अपेक्षा उंचावल्या आहेत.