नागपूर – भारताने दुसऱ्या T20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्स राखून पराभव केला. या विजयासह मालिकाही 1-1 अशी बरोबरीत आली आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील निर्णायक सामना 25 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये खेळवला जाईल. ओल्या मैदानामुळे टॉसला दोन तास 45 मिनिटे उशीर झाला. सामना प्रत्येकी आठ षटकांचा करण्यात आला. पॉवरप्ले दोन षटकांचा होता आणि गोलंदाजाला फक्त दोनच षटके टाकायची होती.
पहिल्या T20 मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा चार विकेट्सने पराभव केला. दुसऱ्या T20 मध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी दोन बदल केले आहेत. सामना आठ षटकांचा होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने आठ षटकांत पाच बाद 90 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 7.2 षटकांत चार गडी गमावून 92 धावा करत विजय साकार केला.
भारताने लक्ष्याचा पाठलाग 7.2 षटकांत चार विकेट्सच्या मोबदल्यात केला. कर्णधार रोहित शर्माने 20 चेंडूत 46 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत चार चौकार आणि चार षटकार मारले. त्याचवेळी दिनेश कार्तिकने आठव्या षटकात एक षटकार आणि एक चौकार मारून सामना संपवला. कार्तिक दोन चेंडूत 10 धावा करून नाबाद राहिला. केएल राहुल 10 धावा, विराट कोहली 11 धावा. त्याचवेळी सूर्यकुमार यादवला खातेही उघडता आले नाही. अॅडम झाम्पाने तीन विकेट घेतल्या.
2ND T20I. India Won by 6 Wicket(s) https://t.co/PMFUaJCvS8 #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) September 23, 2022
तत्पूर्वी, टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने आठ षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 90 धावा केल्या होत्या . मॅथ्यू वेडने 20 चेंडूत 43 धावांची नाबाद खेळी केली. त्याचवेळी अॅरॉन फिंचने 15 चेंडूत 31 धावा केल्या. अक्षर पटेलने दोन गडी बाद केले.