India vs Australia 4Th T20 Match Results : टीम इंडियाने रायपूर टी-20मध्ये ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव करत पाच सामन्यांची टी-20 मालिकाही खिशात घातली आहे . प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 9 गडी गमावून 174 धावा केल्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ निर्धारित 20 षटकात केवळ 154 धावाच करू शकला.
रिंकू सिंग आणि जितेश शर्मा यांनी टीम इंडियाच्या फलंदाजीत आपली ताकद दाखवली. त्याचवेळी अक्षर पटेलच्या फिरकीने गोलंदाजीत कहर केला. भारतीय संघाने आता या T20 मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना ३ डिसेंबरला बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल.
ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मॅथ्यू वेडने सर्वाधिक नाबाद 36 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने 31 आणि मॅथ्यू शॉर्टने 22 धावांचे योगदान दिले. बेन मॅकडरमॉट आणि टीम डेव्हिडने प्रत्येकी 19 धावांचे योगदान दिले. भारताच्या विजयात फिरकी गोलंदाजांनी सर्वाधिक योगदान दिले. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या चार विकेट भारतीय फिरकीपटूंनी घेतल्या. अक्षर पटेलने तीन आणि दीपक चहरने दोन गडी बाद केले. रवी बिश्नोई आणि आवेश खान यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. मात्र, भारतीय फिरकीपटूंनी अतिशय संयमी गोलंदाजी केली आणि अक्षर-रवीने मिळून आठ षटकांत 33 धावा देत चार बळी घेतले.
An excellent bowling display in Raipur 🙌#TeamIndia take a 3⃣-1⃣ lead in the T20I series with one match to go 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/iGmZmBsSDt#INDvAUS | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/2kc2WsYo2T
— BCCI (@BCCI) December 1, 2023
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना रिंकू सिंग, यशस्वी जैस्वाल, जितेश शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांच्या खेळीच्या जोरावर निर्धारित 20 षटकात 9 बाद 174 धावा केल्या .
या सामन्यात टीम इंडियाची स्थिती चांगली होती, पण भारताने शेवटच्या दोन षटकात पाच विकेट गमावल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर 175 धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात टीम इंडियाला शेवटच्या दोन षटकात केवळ 13 धावा करता आल्या आणि पाच विकेट गमावल्या. त्यामुळे भारताची धावसंख्या 200 धावांच्या जवळपास पोहोचू शकली नाही.
भारताकडून रिंकू सिंगने 29 चेंडूत 4 चौकार अन् 2 षटकारासह सर्वाधिक 46 धावा केल्या. यशस्वी जैस्वालने 28 चेंडूत 37 आणि जितेश शर्माने 19 चेंडूत 35 धावांचे योगदान दिले. रुतुराज गायकवाड 28 चेंडूत 32 धावा करून बाद झाला. तर कर्णधार सूर्यकुमार यादव केवळ 1 आणि श्रेयस अय्यर 8 धावा काढून माघारी परतले.
ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत बेन डॉरिसने सर्वाधिक तीन तर तनवीर संघा-जेसन बेहरेनडॉर्फ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. अॅरॉन हार्डीला एक विकेट मिळाली.