नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशात रामराज्य आणण्याचे आश्वासन दिले होते पण प्रत्यक्षात तेथे गुंडाराज आले आहे, अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. गाझियाबादमध्ये विक्रम जोशी नावाच्या पत्रकाराची हत्या करण्याचा प्रकार अलीकडेच घडला आहे. त्यावरून त्यांनी योगी सरकारवर हा निशाणा साधला आहे.
आपल्या भाचीला काही लोक त्रास देत असल्याची तक्रार जोशी यांनी 16 जुलैला केली होती. म्हणून गुंडांनी त्यांची गोळ्या घालून हत्या केली.
आपल्या भाचीच्या विनयभंगास विरोध करणाऱ्या पत्रकाराची गुंडांकडून हत्या होणे हा गुंडाराजचा आणखी एक प्रकार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनी दिवंगत पत्रकार विक्रम जोशी यांना श्रद्धांजली वाहिली असून त्यांच्या कुटुंबीयांप्रती सांत्वनाही व्यक्त केली आहे.