नवी दिल्ली : आपल्या देशात लाखो मंदिरे आहेत, यातील काही मंदिरे अतिशय गूढ आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मंदिराविषयी सांगणार आहोत जे खूप रहस्यमय मानले जाते. कारण या मंदिरात जनावराचा बळी दिल्यानंतरही तो मरत नाही. हे मंदिर बिहारमध्ये आहे जे ‘मुंडेश्वरी माता मंदिर’ म्हणून ओळखले जाते. या मंदिरात बोकडाचा बळी देण्याची प्रथा आहे, मात्र मंदिरात बोकडाचा बळी दिल्यानंतरही तो मरत नाही. उलट तो पुन्हा जिवंत होतो आणि मंदिरातून बाहेर पडतो.
हे मंदिर कैमूर पर्वताच्या शिखरावर 600 फुटांपेक्षा जास्त उंचीवर बांधले गेले आहे. हे मंदिर हजारो वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. इतिहासकारांच्या मते हे मंदिर इसवी सन 108 मध्ये बांधले गेले. जे शकाच्या काळात बांधले गेले. हे मंदिर भगवान शिव आणि देवी शक्तीला समर्पित आहे. जो बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील कौरा भागात आहे. या मंदिरात शतकानुशतके बलिदान देण्याची परंपरा चालत आली आहे. पण या मंदिरात नैवेद्य देण्याची परंपरा वेगळी आहे. या मंदिराची खास गोष्ट म्हणजे या मंदिरात बोकडाचा बळी दिला जातो. मात्र त्याचा जीव घेतला जात नाही. यज्ञ करण्याची प्रक्रिया भक्तांसमोरच केली जाते.
बलिदानासाठी सर्वप्रथम बोकडाला मातेच्या मूर्तीसमोर आणला जातो. यानंतर, त्याला तिथे झोपवल्यानंतर, काही मंत्रांचा उच्चार करून पुजारी त्याच्यावर तांदूळ फेकतो. मातेच्या मूर्तीला स्पर्श केल्यानंतर हा तांदूळ बोकडावर टाकला जातो. तांदूळ फेकल्याबरोबर बोकड एकदम मृतसमान होतो. त्याला पाहून बोकड मृत झाल्यासारखाच दिसतो. कारण या काळात बोक अजिबात हालचाल करत नाही. यानंतर पुन्हा त्याच पद्धतीने बोकडावर तांदूळ टाकला जातो. बोकडावर तांदूळ टाकताच उपस्थित भाविक मातेचा जयजयकार सुरू करतात. यानंतर लगेच बोकड उठून बसतो. बलिदानाच्या या प्रक्रियेनंतर बोकडाला सोडले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार या भागात चंड आणि मुंड नावाच्या दोन राक्षसांचे वास्तव्य असल्याने माता येथे प्रकट झाली. त्यांचा अंत करण्यासाठी माता येथे आली होती. मातेने चंडाचा वध केल्यावर मुंड तेथून पळाला आणि येथील डोंगरात लपला. त्यानंतर मातेने त्यालाही मारून टाकले. यासोबतच या मुंडेश्वरी मंदिरात एक प्राचीन पंचमुखी शिवलिंगाची मूर्ती आहे, जी दिवसातून तीन वेळा रंग बदलते. येथील शिवलिंगाचा पाहता पाहताच रंग बदलतो असे लोक सांगतात.